कान्हुर पठार
कान्हूर पठार
नगरकर वाडा
२३ फेब्रुवारी २०२०
ता : पारनेर
जि : अहमदनगर
मार्ग : पूणे -वाघोली -लोणीकंद -शीक्रापुर -रांजणगाव -मळढन -टाकळी हाजी निघोज -अळकुटि गाव-पिंपळगावरोठा-कान्हुर पठार.
अंतर : पुण्यापासून १३७ किलोमीटर.
पिंपळगावरोठा पासून १३ किलोमीटर.
कान्हूर पठार – हे गाव पूर्वी, कान्हूर मल्लाची वाडी या नावाने ओळखले जात. या ठिकाणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे ,
सरदार नारो बाबाजी अभ्यंकर उर्फ नगरकर
यांचा भव्य वाडा आहे.
याशिवाय अळकुटी, भाळवणी, नांदूर पठार, देवीभोयरे या गावांनाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
कान्हुरपठारचा प्रतिशनिवारवाडा:
पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील सरकारवाडा म्हणजे ऐतिहासिक वास्तूशिल्पच आहे. पुण्यातील पेशवेकालीन शनिवारवाडा सर्वांना परिचित आहे. पण नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये कान्हूरपठार सारख्या दुर्गम गावामध्ये हा प्रतिशनिवार-वाडा अजूनही उभा आहे. पेशवेकालीन घटनांचा हा एकमेव मुक साक्षीदार. पुण्यातील शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर असाच देखणा वाडा कान्हूरपठार येथे ‚ असावा असे पेशव्यांना वाटल्याने त्यांचे पराक्रमी व निष्ठावान सरदार नारो बाबजी नगरकर यांना कान्हूरपठार परिसराची जहागिरी देऊन पुण्यातील शनिवार वाड्यासारखाच वाडा बांधून घ्यावा अशी आज्ञा केली. त्यासाठी त्यांनी शनिवारवाडा बांधकामासाठी ज्या कलाकार व कारागीर यांचा वापर केला होता तेच कलाकार व कारागिर कान्हूरपठार येथे पाठवून दिले. काही कालावधीतच,
पुण्याच्या शनिवार वाड्याप्रमाणेच कान्हूरपठार येथे वाडा बांधून पूर्ण झाला.
त्यानंतरच्या काळात सरदार नगरकरांनी पेशव्यांच्या पदरी निष्ठा दाखवून अनेक लढायांमध्ये भाग घेऊन आपले शौर्य दाखविले. पुण्याच्या शनिवार वाड्याच्या आतील भागातील वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बराच भाग नष्ट झाला आहे. परंतु कान्हूरपठार येथील सरकार वाड्याचा संपूर्ण भाग आजही चांगल्या अवस्थेत
असून वाड्याला असणारी तटबंदी अजूनही भक्कम आहे.
वाड्याच्या चारही बाजुंना भक्कम बुरुज असून त्यांची पडझड न झाल्याने उत्तम स्थितीत आहेत. बुरुजांसह तटबंदीचा बराचसा भाग पांढऱ्या शुभ्र मातीत
बांधला असूनही त्यावेळी मातीवर विशिष्ट प्रक्रिया करुन, त्यात विविध रसायने मिसळून बांधला असल्याने सलग दोन वर्षे अतिवृष्टी होऊनही बांधकाम अजिबात ढासळले नाही हे विशेष!
वाड्याला बाहेरील बाजूस पूर्व दिशेला भव्य दरवाजा असून तो अजूनही सुस्थितीत आहे.
मुख्य दरवाजा आतील बाजूस पूर्ण काळ्या पाषाणात घडविलेले प्रवेशद्वार असून त्यांच्या बाहेरील बाजूस पुण्याच्या शनिवारवाड्यासारखी रचना केलेली आढळते. दुसऱ्या प्रवेशद्वारानंतर आतील बाजूस तिसरे भव्य प्रवेशद्वार असून सर्व ,
प्रवेशद्वारांचे दरवाजे सागवानी लाकडाचे आहेत.
त्यावरील नक्षीकाम अलंकारिक स्वरुपाचे असून आतील बाजूस
तिसरे भव्य प्रवेशद्वार असून सर्व प्रवेशद्वारांचे दरवाजे सागवानी लाकडाचे आहेत. त्यावरील नक्षीकाम अलंकारिक स्वरुपाचे
असून पेशवेकालीन कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे.
आज आम्ही जेव्हा या वाड्याला भेट दिली, त्यावेळेस आम्हाला येथे खुप प्रमाणात वाड्या ची पडझड झालेली नजरेस पडली.
हा वाडा पहिला दुमजली होता.साधारण दहा वर्षांपूर्वी या वाड्याची स्थिती खूपच चांगली होती.गेल्या दहावर्षापासून वाड्या ची अवस्था खूपच बिकट होऊ लागली.
वाडा हळू हळू पाडायला सुरुवात झाली.ही विक्रुत्ती म्हणायची कि काय हे मोठे प्रश्नचिन्ह व शोकांतिका आहे.जुन्या वास्तू जतन करणे हे खरं तर व्हायला हवे.हा वाडा तसा बंद असतो.
आत मधे खुप गवत वाढल्यामुळे
येथे जाणे जोखीमेचे आहे.विंचू , साप यांचा खुप सुळसुळाट आहे येथे.गेली ३५ वर्ष भालेकर ही वयोवृद्ध व्यक्ती या वाड्याची ईमाने -इतबारी देखभाल करीत आहे.
येत्या काळात हा वाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे , याची पक्की खात्री नाकारता येत नाहि.
- समस्त भटक्या मंडळीनी या ठिकाणी लवकरच अवश्य भेट द्यावी.अन्यथा येत्या काळात हा वाडा नामशेष होऊन , फक्त आठवनी शिल्लक राहतील.




















2 वर्षांपूर्वी आम्ही पण भेट दिली या वाड्याला
ReplyDeleteमाहिती अपूर्ण आहे. काही संदर्भ चुकीचे आहेत
ReplyDeleteसविस्तर माहिती देऊ शकता का आपण, कोणते संदर्भ चुकीचे आहेत, ते कळविने.
Deleteजेणेकरुन मी यात बदल करु शकतो
वेगळ्या आणि हटके भटकंती
ReplyDelete